आता प्रत्येक शेताला रस्ता; महाराष्ट्र शासनाची नवी समग्र योजना जाहीर

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 13, 2025
आता प्रत्येक शेताला रस्ता; महाराष्ट्र शासनाची नवी समग्र योजना जाहीर

Maharashtra Shet Rasta Samagra Yojana Update : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आता प्रत्येक शेताला रस्ता मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, राज्यातील सर्व शेतांपर्यंत रस्ते पोहोचण्यासाठी शासन एक समग्र योजना तयार करणार आहे.

या योजनेत विविध विभागांच्या निधीचा समन्वय केला जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार होईल आणि ती एक महिन्यात उपाययोजनांचा अहवाल सादर करेल.

मुख्यमंत्री म्हणाले की,

  • शेत रस्ते करताना कौशल्यावर आधारित काम आवश्यक असल्यास, संबंधित योजनांचा निधी एकत्र करून काम पूर्ण केले जाईल.
  • २५-१५ योजनेतील ५०% निधी शेत रस्त्यांसाठी वापरण्याचा निर्णय होणार आहे.
  • शेतरस्त्यांची प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित ठेवली जातील.
  • शेतरस्त्यांची रुंदी किमान १२ फूट ठेवण्यात येईल.
  • जमाबंदी आयुक्तांमार्फत शेत रस्त्यांना क्रमांक देण्याची कार्यवाही केली जाईल.
  • शेतरस्त्यांसाठी रोजगार हमी योजना, ग्रामविकास व महसूल विभाग यांच्याशी चर्चा करून स्वतंत्र लेखाशीर्ष तयार केले जाईल.

तसेच, चालू रस्त्यांचे सर्वेक्षण, नकाशावर नोंदणी, लोक अदालती घेणे आणि रस्त्यांचे सपाटीकरण यासाठीही पावले उचलली जाणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सोयीचे रस्ते मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp