“शासन आपल्या दारी” उपक्रमातून घरपोच ई-केवायसी सेवा; हजारो लाभार्थ्यांना दिलासा

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 5, 2025
“शासन आपल्या दारी” उपक्रमातून घरपोच ई-केवायसी सेवा; हजारो लाभार्थ्यांना दिलासा

Gharpoch e Kyc Shasan Aplya Dari : जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रियेअभावी मानधन मिळण्यास विलंब होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत घरपोच ई-केवायसी मोहिम हाती घेण्यात आली आहे.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमात आतापर्यंत १,४३१ लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अजून ९,३३७ लाभार्थींची प्रक्रिया प्रलंबित आहे. आठवड्याभरात दीड हजार लोकांपर्यंत ही सेवा पोहोचली आहे.

ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे, त्यांनी पुढाकार घेऊन ग्रामसेवक, तलाठी, महसूल कर्मचारी अथवा स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. संबंधित कर्मचारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अडचणीत असलेल्या, वृद्ध, अपंग, विधवा, अनाथ नागरिकांना मासिक आर्थिक सहाय्य देणे. हे सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे ४१ हजार लाभार्थी आहेत, त्यातील ८,०९७ जणांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. श्रावणबाळ योजनेतील ५१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांपैकी १,२४० जणांचे केवायसी न झाल्याने त्यांना मानधन थांबले आहे.

ई-केवायसी झाल्याशिवाय लाभ अडतो, त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रशासनाचा यावर सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp