वीज ग्राहकांच्या घरी बसणार स्मार्ट मीटर.

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: February 29, 2024
वीज ग्राहकांच्या घरी बसणार स्मार्ट मीटर.
— Smart meters will be installed at the homes of electricity consumers

राज्यातील वीज ग्राहक आता स्मार्ट होणार आहेत. ग्राहकांच्या वीज बिलातील अनियमितता दूर करण्यासाठी महावितरणने 2 कोटी 37 लाख वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीजवापराचे स्वयंचलित अचूक मीटर रीडिंग घेतल्याने ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिल मिळेल. हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणने चार एजन्सी नेमल्या असून, ते १५ मार्चपासून सुरू होणार आहेत.

महावितरणचे राज्यभरात तीन कोटींहून अधिक वीज ग्राहक आहेत. कृषी पंप वगळता सर्व वीज ग्राहकांच्या वीजवापराचे मीटर रीडिंग दरमहा घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज कर्मचाऱ्याला संबंधित ग्राहकाच्या वीज मीटरच्या ठिकाणी जाऊन मीटरचे रिडिंग घेणे, बिल तयार करून ग्राहकाला पाठवणे आवश्यक आहे. तसेच मीटर रीडिंग घेताना संबंधित कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्यास ग्राहकाला चुकीचे बिल येते व ते दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहकाला वीज कंपनीच्या कार्यालयात जावे लागते. त्यामुळेच महावितरणने कोल्हापूर वगळता इतर वीजग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

किंमत आठ-दहा हजार रुपये

हे स्मार्ट मीटर महावितरणच्या चार कंपन्यांच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटरची किंमत सुमारे 8 ते 10 हजार रुपये आहे. त्यामुळे एकूण 2 कोटी 42 लाख मीटर्ससाठी सुमारे 25 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हे पान वाचा : Jio Prime 5G : Jio घेऊन येत आहे गरीबांसाठी 5G स्मार्टफोन , त्यांना वर्षभर मोफत कॉलिंग आणि फ्री इंटरनेट मिळेल

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp