आनंदाची बातमी…जळगाव-मुंबई विमानसेवा ‘या’ तारखेपासून सुरू होणार!

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 7, 2024
आनंदाची बातमी…जळगाव-मुंबई विमानसेवा ‘या’ तारखेपासून सुरू होणार!

Jalgaon To Mumbai Flight Update : पुणे, गोवा, हैदराबादसाठी सुरु झालेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस जळगावहून मुंबईसाठी विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारत सरकारच्या ‘अलायन्स एअर’ या विमान कंपनीकडून सदरची सेवा पुरविण्यात येणार आहे. (Jalgaon Airport)

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून

मुंबई-जळगाव-मुंबई या विमानसेवेला 16 जूनपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. ‘अलायन्स एअर’ या विमान कंपनीकडून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस मुंबई- जळगाव ही विमानसेवा चालविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून सदरची विमानसेवा नियमित केली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

मुंबई ते जळगाव विमानसेवा सुरू झाल्यानंतर मंत्रालयीन कामानिमित्त तसेच इतर खासगी कामानिमित्त मुंबईचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खूप मोठी सोय होऊ शकणार आहे. कारण, रेल्वेने मुंबई गाठण्यासाठी सध्याच्या घडीला किमान सहा तास तरी लागतात. त्यात गर्दीच्या हंगामात लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बऱ्याचवेळा जागा मिळत नाही.

जळगावहून-अहमदाबाद विमानसेवेचाही प्रस्ताव

गोवा, हैदराबाद, पुणे आणि आता मुंबईची विमानसेवा सुरळीत झाल्यानंतर जळगाव येथून अहमदाबादसाठी देखील विमानसेवा प्रस्तावित आहे. केंद्र सरकारची ‘अलायन्स एअर’ कंपनी अहमदाबाद-जळगाव-अहमदाबाद दरम्यान विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या तयारीला देखील लागली आहे. त्यासंदर्भात अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

आता आठवड्यातून चार दिवस जळगाव ते पुणे विमानसेवा; वेळापत्रक पहा?

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp