Maharashtra Dam Water Storage 2024 : आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा?


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Maharashtra Dam Water Storage 2024 : सध्या राज्यात पाऊस पडत असला तरी महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती पाणी शिल्लक आहे? शोधा..

Maharashtra Dam Water Storage 2024 : राज्यात सध्या ठिकठिकाणी पाऊस पडत असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणांमधून काही प्रमाणात (पाणी) सोडण्यात येत असून, अनेक धरणे मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यातील कोणत्या धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे?

जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातील एकूण धरणांमध्ये आता ३६.०७ टक्के उपयुक्त धरणसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ १५.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा सर्वात कमी धरणसाठा आहे.

कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण तसेच सूर्या धामणी आणि अप्पर वैतरणा धरणात पाणीसाठा वाढत असून आता कोकणातील धरणे 50 टक्क्यांवर पोहोचली आहेत.

  1. भातसा- 54.42%
  2. सूर्या धामणी- 50.68
  3. अप्पर वैतरणा- 37.50

Sheti Yojana : या योजनेअंतर्गत मिळत आहे 2.5 लाखांपर्यंतचे अनुदान, असा करा अर्ज

मराठवाडा पाण्याच्या प्रतीक्षेत आहे

मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. जायकवाडीचा पाणीसाठा अजूनही ५ टक्क्यांच्या वर नसल्याने मराठवाड्यातील हजारो गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

  1. जायकवाडी- 4.13
  2. निम्न दुधना- 6.27
  3. पूर्णा येलदरी- 30.09
  4. माजलगाव – ०
  5. मांजरा- ०
  6. ऊर्ध्व पैनगंगा- 39.55
  7. तेरणा- 23.45

नाशिक विभागात काय परिस्थिती आहे?

नाशिक विभागात सध्या २७.८६ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी हा पाणीसाठा ३९.१० टक्के होता. नाशिक विभागातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असून सर्वाधिक धरणे असलेल्या या विभागातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढत असल्याचे चित्र आहे.

  1. दारणा- 49.95
  2. गंगापूर- 33.67
  3. भंडारदरा- 44.90
  4. मूळा- 21.69
  5. गिरणा- 61.48
  6. हतनूर- 33.80
  7. वाघुर- 63.28

शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यास कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता कसा मिळवायचा?

पुणे विभागातील किती धरणे भरली?

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली असून, बहुतांश धरणांमधील पाणीसाठा आता वाढू लागला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील प्रमुख धरणेही ५० टक्के, वारणा ६०.५३, राधानगरी ७०.५९ आणि कोयना ४५.५८ टक्क्यांवर पोहोचली आहेत.

  1. डिंभे- 24.49
  2. पानशेत- 51.37
  3. खडकवासला- 70.24
  4. पवना 39.27
  5. चाकसमान- 25.79
  6. नीरा देवघर 34.12

नागपूर, अमरावती विभागात काय परिस्थिती आहे?

विदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे यंदा धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, बहुतांश धरणांतील पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. अमरावती विभागात उर्धा वर्धा धरण ४७ टक्के तर बेंबळा ४५ टक्के भरले आहे. काटेपूर्णा ३०.५७ तर खडकपूर्णा शून्यावर आहे.

  1. निम्न वर्धा- 53.95
  2. गोसीखुर्द- 30.03
  3. पेंच तोतलाडोह- 59.39

गोंदियातील पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, 8 दरवाजे उघडले

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नद्या, कालव्यांसह धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. आमगाव व सालेकसा तालुक्याच्या सीमेवरील पुजारीटोला धरण हे सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे धरण असून ते ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 08 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून 6047 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने बाग नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

आता मोबाईल वर बघा आपल्या जमिनीचा नकाशा

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.