राज्यातील अंगणवाड्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; आता जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार स्थलांतर

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 4, 2025
राज्यातील अंगणवाड्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; आता जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार स्थलांतर

Anganwadi Sthalantar Zp aschool Mahatvacha Nirnay : राज्यात एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना आता जिल्हा परिषद शाळांतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास विभागाने यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, यासाठी अंगणवाडी आणि शाळा यांच्यामधील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात सध्या ५५३ बालविकास प्रकल्प आहेत, ज्यात १ लाख १० हजारांहून अधिक अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. अनेक अंगणवाड्या भाड्याच्या जागेत, समाज मंदिरात किंवा अस्थायी ठिकाणी चालवल्या जात असल्याने या निर्णयामुळे स्थैर्य निर्माण होणार आहे.

अंगणवाड्यांना शाळेतील वर्गखोली देताना ती सुरक्षित आणि वापरण्यास योग्य आहे की नाही, याची खातरजमा करण्यात येणार आहे. शाळेतील इतर सुविधा जसे की स्वयंपाकघर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, खेळाचे साहित्य आदींचा वापर अंगणवाडीतील बालकांसाठी करता येणार आहे.

शाळेत वर्गखोली नसेल पण जागा उपलब्ध असेल, तर अंगणवाडीची स्वतंत्र इमारत उभारण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येतील. तसंच जीर्ण अवस्थेतील किंवा बांधकाम न होणाऱ्या इमारतींमध्ये असलेल्या अंगणवाड्यांनाही शाळांमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे.

या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर समितीची नियुक्ती होणार असून, या समितीने तीन महिन्यांतून एकदा आढावा घेत अहवाल राज्याला सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp