जळगावच्या वाघूर नदीला पूर; जिल्हा प्रशासनाने केले सतर्क राहण्याचे आवाहन

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: September 4, 2024
जळगावच्या वाघूर नदीला पूर; जिल्हा प्रशासनाने केले सतर्क राहण्याचे आवाहन
— vaghur nadi pur news

Waghur river : वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात अजिनाथ पर्वतराजीतून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून, जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील ४ गावे जलमय झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे सर्वच गावांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बाधित गावांना भेटी देऊन पाहणी केली व मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले.

वाघूर नदीच्या परिसरातील सर्व गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्यामुळे कोणतीही जीवित वा पशुधनाची हानी झाली नसून आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त गावांना आवश्यक ती मदत देण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करत आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला (एसडीआरएफ) मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले असून त्यांच्याकडून आवश्यक मदतकार्य केले जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इ. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) एक टीमही मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे.

तापी व वाघूर नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जाऊ नये व गुरे घेऊन जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक 02572217193 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले, असा करा क्लेम

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp