देशातील करोडो मोबाईल वापरकर्त्यांसाठी १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम!

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: November 26, 2024
देशातील करोडो मोबाईल वापरकर्त्यांसाठी १ डिसेंबरपासून बदलणार हा नियम!

TRAI’s new rules 2024 : देशभरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल फोन नसलेली व्यक्ती सापडणे दुर्मिळ आहे. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट संदर्भात बदलत्या नियमांची माहिती असायला हवी. असाच एक महत्त्वाचा नियम बदलत आहे.

इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने अनेक प्रकारचे धोकेही वाढले आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक अवघड कामे सोपी झाली आहेत. परंतु यामुळे स्कॅमर आणि सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्ग देखील मिळाला आहे.

परंतु भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( TRAI ) याविरोधात जोरदार प्रयत्न करत आहे. ट्रायने अलीकडच्या काळात देशभरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल फोन नसलेली व्यक्ती सापडणे दुर्मिळ आहे. फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना ट्रेसिबिलिटी लागू करण्याचे निर्देश दिले होते. तो एक मोठा निर्णय होता.

ट्रायने ऑगस्टमध्ये व्यावसायिक संदेश आणि ओटीपीशी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. त्याच्या अंमलबजावणीची तारीख अनेक वेळा बदलली गेली.

दूरसंचार कंपन्यांना यापूर्वी TRAI OTP संदेश ट्रेसिबिलिटी लागू करण्यासाठी 31 ऑक्टोबरची अंतिम मुदत देण्यात आली होती. Jio, Airtel, VI आणि BSNL च्या मागणीनंतर कंपनीने आपली मुदत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती.

आता मुदत संपली आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना व्यावसायिक संदेश आणि ओटीपी संदेश ट्रॅक करण्यासाठी ट्रेसेबिलिटी नियम लागू करावे लागतील.

जर Jio, Airtel, VI आणि BSNL ने 1 डिसेंबरपासून ट्रेसिबिलिटी नियम लागू केला, तर OTP मेसेज यायला वेळ लागू शकतो. तुम्ही बँकिंग किंवा आरक्षणात काम करत असल्यास, तुम्हाला OTT मिळण्यास वेळ लागू शकतो.

अनेक वेळा फसवणूक करणारे बनावट OTP मेसेज पाठवून लोकांच्या हँडसेटमध्ये प्रवेश मिळवतात. यामुळे लोकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp