Navin Pik Vima Yojana 2025 : (Crop Insurance Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना टाळता न येणाऱ्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. या योजनेत खालील प्रकारच्या नुकसानांना कव्हर करण्यात येते:
- पेरणी/लावणी/उगम न होणे (Prevented Sowing/Planting/Germination)
प्रतिकूल हवामानामुळे अधिसूचित क्षेत्रात 75% पेक्षा अधिक भागात पेरणी होऊ न शकल्यास अशा क्षेत्राला विमा संरक्षण मिळते. - हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान (Mid-Season Adversity)
पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस यांसारख्या संकटांमुळे उत्पादनात मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता असल्यास विमा दावा दिला जातो. - पिक उत्पादनातील घट (Standing Crops)
दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव अशा टाळता न येणाऱ्या घटनांमुळे उत्पादनात घट झाल्यास संरक्षण दिले जाते. - स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities)
गारपीट, विज कोसळणे, ढगफुटी, नैसर्गिक आग यामुळे अधिसूचित पिकाच्या ठराविक क्षेत्रात नुकसान झाल्यास वैयक्तिक पंचनाम्याद्वारे नुकसान भरपाई दिली जाते. - काढणीनंतर नुकसान (Post-Harvest Losses)
काढणीनंतर 14 दिवसांच्या आत बिगरमोसमी पावसामुळे किंवा गारपीट, चक्रीवादळामुळे नुकसान झाल्यास, पंचनाम्यानंतर नुकसान भरपाई मिळते. - अपवाद
युद्ध, अणुयुद्ध, हेतुपुरस्सर नुकसान किंवा टाळता येण्यासारख्या धोक्यांसाठी विमा संरक्षण दिले जाणार नाही.