25 जूनपासून मुसळधार पाऊस, पहा तुमच्या परिसरात कुठे आहे पाऊस?


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा.......

यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वर्षी अवकाळी पावसाचा जोर नंतर मंदावला आहे. आता मंगळवारपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे कोणत्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update 2024 : महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू लागला आहे. रविवारी सायंकाळी पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता हवामान खात्याने (IMD) मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यभर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. 25 ते 27 जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस सहा जूनलाच कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर 8 जूनला पुण्यात आणि 9 जूनला मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मान्सून दाखल झाला. मात्र मान्सूनचा वेग मंदावला होता. अशा परिस्थितीत उष्णतेपासून सुटकेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात दाखल झाल्यानंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

शेतात ‘घर’ बांधण्याचा विचार करताय? तर जरा थांबा! कायदेशीर बाबी जाणून घ्या, अन्यथा घर पाडावे लागेल

या आठवड्यात मुसळधार पाऊस

आता राज्यात मान्सूनचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल बदल दिसून येत आहेत. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार मंगळवारपासून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 25 ते 28 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.

यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झाला. मात्र महाराष्ट्र आणि मुंबईसह अन्य भागात अजूनही पावसाचा जोर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत लोक पावसाची वाट पाहत आहेत.

बी-बियाणे, खते योग्य दरात मिळत नसतील तर या टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार…


इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.

Leave a Comment