Crop Insurance Scheme 2025 Deadline Extended : तकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ६ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.
या योजनेअंतर्गत द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू आणि मोसंबी या फळपिकांचा समावेश आहे. पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम मुदत होती. मात्र २७ जूनपासून आधार संकेतस्थळासंदर्भात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे केंद्र शासनाने ४ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
टीप: ई-पिक नोंद नसल्यास अर्ज अमान्य ठरू शकतो. जुलै – ऑगस्टमध्ये ई-पिक नोंदणी करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या विमा कंपनी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात.
प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो.
Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात.
या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More