Ladki Bahin Yojana : सरकारच्या तिजोरीवर ताण, योजना बंद होणार का? जाणून घ्या नेमकं काय घडलं…

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 15, 2025
Ladki Bahin Yojana : सरकारच्या तिजोरीवर ताण, योजना बंद होणार का? जाणून घ्या नेमकं काय घडलं…
— Ladki Bahin Yojana Financial Burden Will It Stop

Ladki Bahin Yojana Financial Burden Will It Stop : राज्यातील महिलांसाठी सुरु असलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेमुळे विकासकामांना निधी मिळण्यास उशीर होत असल्याची टीका काही नेत्यांकडून झाली आहे. यावरून ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

अलीकडेच मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत याबाबत मत व्यक्त करताना म्हटलं की, लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी उशिरा मिळतोय. तर छगन भुजबळ यांनीही ही योजना राज्याच्या तिजोरीवर ताण आणत असल्याचं मान्य केलं आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, “होय, या योजनेमुळे आर्थिक ताण नक्कीच येतोय. पण तरीही योजना बंद होणार नाही. गरज असल्यास काही फिल्टरेशन केलं जाईल. पण लाडकी बहीण योजनेला सरकारची बांधिलकी कायम राहील.”

याच कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील समस्यांवरही भाष्य केलं. “शहरात वाहतुकीची अडचण आहे, रस्त्यांची अवस्था चांगली नाही. सामान्य नागरिक सुखाने राहत नाही तोपर्यंत देवेंद्रजी पुणे दौरे करत राहतील,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp