नवीन पीक विमा योजना: ‘या’ कारणांमुळे नुकसान झाल्यास मिळेल विमा संरक्षण!

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 29, 2025
नवीन पीक विमा योजना: ‘या’ कारणांमुळे नुकसान झाल्यास मिळेल विमा संरक्षण!

Navin Pik Vima Yojana 2025 : (Crop Insurance Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना टाळता न येणाऱ्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. या योजनेत खालील प्रकारच्या नुकसानांना कव्हर करण्यात येते:

  1. पेरणी/लावणी/उगम न होणे (Prevented Sowing/Planting/Germination)
    प्रतिकूल हवामानामुळे अधिसूचित क्षेत्रात 75% पेक्षा अधिक भागात पेरणी होऊ न शकल्यास अशा क्षेत्राला विमा संरक्षण मिळते.
  2. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान (Mid-Season Adversity)
    पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस यांसारख्या संकटांमुळे उत्पादनात मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता असल्यास विमा दावा दिला जातो.
  3. पिक उत्पादनातील घट (Standing Crops)
    दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव अशा टाळता न येणाऱ्या घटनांमुळे उत्पादनात घट झाल्यास संरक्षण दिले जाते.
  4. स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities)
    गारपीट, विज कोसळणे, ढगफुटी, नैसर्गिक आग यामुळे अधिसूचित पिकाच्या ठराविक क्षेत्रात नुकसान झाल्यास वैयक्तिक पंचनाम्याद्वारे नुकसान भरपाई दिली जाते.
  5. काढणीनंतर नुकसान (Post-Harvest Losses)
    काढणीनंतर 14 दिवसांच्या आत बिगरमोसमी पावसामुळे किंवा गारपीट, चक्रीवादळामुळे नुकसान झाल्यास, पंचनाम्यानंतर नुकसान भरपाई मिळते.
  6. अपवाद
    युद्ध, अणुयुद्ध, हेतुपुरस्सर नुकसान किंवा टाळता येण्यासारख्या धोक्यांसाठी विमा संरक्षण दिले जाणार नाही.
Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp