Maharashtra Rain Latest Update : हवामान खात्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे
Latest Marathi Maharashtra Rain News : राज्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र सकाळपासून हा पाऊस थांबला आहे. आता दुपारपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशा नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस पडू शकतो. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि कोकणचा विचार करता मुंबई शहर आणि उपनगरांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना काम असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. येत्या काही तासांत कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात.
प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो.
Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात.
या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More