३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद!

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 23, 2024
३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद!
— If e-KYC is not completed by June 30 the ration will be closed!

Ration Card Update : स्वस्त धान्य वितरण योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ३० जूनची मुदतही देण्यात आली आहे. यानंतर ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्यांना रेशन मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित रेशन दुकानांवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध असून त्या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता प्रत्येक शिधापत्रिकाधारक आणि त्यांच्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांना त्यांचे आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. तसे, सरकार दोन वर्षांपासून आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, सरकारच्या आवाहनाला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच ३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेशन कार्ड ऑनलाइन चेक करा असा काढा १२ अंकी नंबर

ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप रेशन दुकानावर आधार कार्ड लिंक केलेले नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे रेशन दुकानदार संघटनेने आधार रेशन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान, शिधापत्रिकांच्या ई-केवायसीमुळे पात्र आणि अपात्र लाभार्थी शोधणे सोपे होईल. पात्र नसतानाही स्वस्त धान्याचा लाभ घेणारे हे बनावट लाभार्थी कोण हे आता स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ज्यांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झाले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे जळगावचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.

घरबसल्या असे काढा ऑनलाइन रेशन कार्ड?

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp